मुंबई प्रतिनिधी-राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे काही भागांत प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला. त्यावर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेलं नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजानं लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.