निरा नरसिंहपुर: दिनांक- 14,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
भिमाशंकर अभयारण्यात शासनाकडून नेमण्यात आलेले ठेकेदार हे ,मनमानी कारभार करुन प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांचेशी हातमिळवणी करुन अभयारण्यात जाळी बांध चेक डॅम च्या कामात दिवसाढवळ्या राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत. नाममात्र मजुरांना पैसे देऊन काम करणाऱ्या मजुरांचे पैसे हडप करणाऱ्या ठेकेदार यांचेवर कारवाई करुन न्याय मिळावा तसेच ,सदरचे ठेकेदार यांचा परवाना तात्काळ रद्द करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. म्हणून बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने प्रधान मुख्य वनसंरक्षकसो एस एम राव नागपूर यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
या संबंधीत स्थानिक मजुर यांनी तक्रार केल्याने भ्रष्टाचाराबाबत बोलल्याने याचा राग मनात धरून, सुड भावनेने त्यांना या चालुवर्षी कामच दिले नाही.त्यांना जाणुनबुजून डावलल्याने त्यांची उपासमार होत असल्याने आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही.
तसेच गेल्यावर्षीच्याच कामांना रंगरंगोटी करुन ठेकेदार हे अनागोंदी कारभार करत आहे तर प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन बसले आहे.
कामाची मागणी केल्यावर दमदाटी करुन शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी स्थानिक गुंडांमार्फत दिली जाते, त्यामुळे मुस्कटदाबी होत असल्याने कबाडकष्ट करून पोटाची खळगी भरणऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत असल्याने त्यांच्या न्याय व हक्कासाठी बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात आलेला असुन लवकरच न्याय मिळवून देऊ असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.
तरी अशा मनमानी कारभार करणाऱ्या व मुजोर ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांचेवर कधी कारवाई केली जाणार अशी मागणी स्थानिकातुन केली जात आहे.
