नरसिंहपुर: दिनांक- 1,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
माननीय मुख्य अभियंता साहेब यांच्या संकल्पनेतून, मा.अधीक्षक अभियंता साहेब यांच्या विचारातून, मा. कार्यकारी अभियंता साहेब बारामती यांच्या मार्गदर्शनातून व मा. उपकार्यकारी अभियंता साहेब इंदापूर यांच्या अनमोल सहकार्यातून आज पूर्ण बावडा शाखामधील टणु आणि नरसिंगपूर हे गाव RCI & Other मध्ये थकबाकी निरंक (झिरो) झाले असून हि किमया रामहरी रजपुत ( वरिष्ठ तंत्रज्ञ) यांनी करून दाखविली आहे.त्याबद्दल शाखा अधिकारी बावडा -2 यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रामहरी रजपूत हे टणु व नरसिंहपूर या भागामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दिवस असो किंवा रात्र असो जर घोटाळा झाला तर स्वतः ते त्या जागी जाऊन दुरुस्ती करून काही क्षणातच लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. रामहरी रजपूत साहेब हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.

टणु आणि नरसिंहपूर भागामध्ये यांचं काम अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आहे. या ठिकाणचे हे एक खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणूनच लाईटचा घोटाळा झाल्यानंतर त्यांचं लोकांना सहकार्य व लोकांचे त्यांना सहकार्य असते याच कारणासाठी टनु आणि नरसिंहपूर गावामध्ये थकबाकी ही झिरो झालेली आहे . त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा मिळत आहेत.