प्रतिनिधी,
श्रीपूर परिसरात आज दुपारी एक वाजल्यापासून विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. या बाबत या कार्यालयात वारंवार फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता सतत फोन एंगेज लागत आहे. शाखाधिकारी यांचा सहा तासांपासून मोबाईल स्विच ऑफ आहे.
या भागातील वायरमन तसेच त्यांच्या वरचे लोक यांना फोन केले तर त्यांचेही फोन स्विच ऑफ आहेत.
हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांना जाणुनबुजून मनःस्ताप देण्याचा प्रयत्न आहे.
लाईट का बंद आहे, केव्हा येणार हे नागरिकांनी विद्युत वितरण कंपनी संबंधित शाखाधिकारी वायरमन आपरेटर यांच्या कडे चौकशी करायची नाही तर अन्य कोणाकडे हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांच्या सहनशिलतेला आव्हान देण्याचा प्रकार वाटतोय.
