ऐन उन्हाळ्यात पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असताना, उजनी ग्रामपंचायतच्या आडमुठे पणामुळे लोकांना पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाणी मिळत नाही, कारण चालू पाण्याच्या आर.ओ.ची ईमारत कोणताही अधिकृत ठराव न घेता, कोणतीही परवानगी न घेता केवळ विकास कामाच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपूर्वी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करून व्यवस्थित केलेला चालू आर.ओ.प्लांट बंद करुन आर ओ.चे. सामान गायब केले आहे, पाडलेल्या इमारतीचे दगड,धोंडे, विटा, सिमेंट, लोखंडी पाईप, पत्रे या सर्व गोष्टी गायब आहेत की कुणी विकल्या या सर्व बाबी माञ गुलदस्त्यात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती वजा तक्रार गटविकास अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका अध्यक्ष एम डी साबळे यांनी देऊन सुद्धा आद्यापर्यंत गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी केल्याचे आढळून येत नाही ज्याअर्थी सर्व प्रकार गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याअर्थी या सर्व प्रकरणात हे सर्व सामील असावेत अशी कुजबूज सध्या गावात चालू आहे. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अव्हाळे मॅडम आपणास या माध्यमातून विनंती आहे की, या सर्व प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर गावासाठी पाण्याचा आर.ओ.चालू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या व पाण्याचा प्रश्न मिटवावा.