प्रतिनिधी-पोपट वाघमारे
दिघंची ग्रामपंचायत कडून दिला जाणारा दिव्यांगाचा 5% निधी सन 2021व 2022 मधील शंभर टक्के निधी दिनांक 10/ 9 /2022 अखेर वितरित न झाल्यास दिनांक 12 /9 /2022 रोजी दिघांची ग्रामपंचायत समोर सर्व दिव्यांग बांधव आत्मदहन करणार आहेत असे निवेदन बाळासाहेब मारुती औंधकर व अॅड विलासराव देशमुख यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती आटपाडी यांना दिले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की दिघंची ग्रामपंचायत समोर दिव्यांगाचा पाच टक्के निधी 100% मिळावा म्हणून म्हणून10 ऑगस्ट रोजी अमरण उपोषण केले होते. यामध्ये सन 2021 मधील निधी एक लाख 96 हजार 814 व 2022 मधील दोन लाख दहा हजार तीनशे दहा रुपये इतका ध्येय निधी एक महिन्याच्या आत देतो असे लेखी आश्वासन दिघंची ग्रामपंचायतीने दिले होते परंतु अद्यापही दिव्यांग बांधवांना एक रुपयाचे देखील ध्येय अनुदानापैकी मिळालेले नाही येत्या 12 सप्टेंबर रोजी दिघांची ग्रामपंचायत समोर सामुदायिक आत्मदहन करणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे सदर प्रसंगी आमचे जीवितास धोका पोहोचले स त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत दिघंची यांच्यावर राहील.