श्रीपूर प्रतिनिधी.
सदानंद बनसोडे सर.
श्री.चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये आज आषाढी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.
कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते.
सकाळी शाळेच्या मैदानापासून पालखी सोहळ्याची सुरवात झाली. नंतर
पंढरपुरच्या वारीप्रमाणेच श्रीनगर वसाहतीत रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते.
अश्वरिंगणात बाल गोपाळाणी फुगड्या खेळून पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.
मुलांच्या हातात भगवे झेंडे, तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन होते.
हे बघून जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
गेली दोन वर्षे कोरोना मुळे पालखी सोहळा झाला नव्हता. मात्र यावर्षी पालखी सोहळा विठ्ठू नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
जागृती तरुण मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा जाधव, सहसचिव नाकुरे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी उत्तमरित्या केले.


