• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

बँकेत नोकरी लावण्याच्या भूलथापा देऊन बेरोजगारांची फसवणूक; तिघांना अटक

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 2, 2021
in Uncategorized
0
थकीत कर्जाचे हप्ते आणि नागरिकांचे अधिकार; जागरूक असणे गरजेचे आहे. बँकांनी हे नियम पाळणे महत्वाचे

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 2 आगष्ट 2021:-

लॉकडाउन आणि कडक निर्बंधामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना फसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाचप्रकारे ॲक्सिस बँकेत नोकरी लावण्याच्या भूलथापा देऊन शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पायधुनी पोलिसांनी भांडाफोट केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

https://youtu.be/tAb_-4mIC6k
👆 लिंक वर टच करून व्हिडीओ पहा व आवडल्यास शेअर करा
⭕ऑक्सिजन पातळी घरच्या घरी कशी चेक करावी

बोगस कॉल सेंटर थाटून हे सर्वजण बेरोजगारांना गंडा घालत होते.
पायधुनीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या एका महिलेला अनोळखी तरुणाचा फोन आला. नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगत ॲक्सिस बँकेत नोकरीभरती सुरू असल्याचे तो म्हणाला. बँकेत नोकरी मिळत असल्याने या महिलेने तयारी दाखवली. नोकरी डॉट कॉमप्रमाणे हुबेहूब तयार करण्यात आलेल्या ई-मेल आयडीवर महिलेने स्वतःचा वैयक्तिक तपशील पाठवला. यानंतर नोंदणीशुल्क, मुलाखतशुल्क, पोलिस पडताळणी अशी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळण्यात आले. पैशाची मागणी थांबत नसल्याने महिलेला संशय आला आणि तिने दिलेले पैसे परत मागितले. यावर समोरच्या व्यक्तीने संपर्कच तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पायधुनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करीम शेख, अनंत साळुंखे, सहाय्यक निरीक्षक निलेश बनकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांवरून ही टोळी उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात कार्यरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दिल्ली गाठून कैलाश रामचंद, सतीशकुमार कल्याण सिंग आणि गीता सिंग यांना अटक केली. या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन या टोळीने कॉल सेंटर थाटले होते.
फसवणुकीचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून त्यात
पोलिसांनी या आरोपींकडून १४ मोबाइल, आठ सीमकार्ड, तीन लॅपटॉप, २५ एटीएम-डेबिट कार्ड, दोन पॅनकार्ड, सहा आधारकार्ड, बँकेची १४ नियुक्ती पत्रे, चार पासबुक, नऊ चेकबुक तसेच इतर साहित्य जप्त केले. ही टोळी ऑनलाइन पैसे स्वीकारण्यासाठी बोगस ओळखपत्रांच्या आधारे काढण्यात आलेल्या बँक खात्याचा वापर करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

Tags: #बँक माहितीबँक ऑफ इंडिया

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
संस्थांनी अवाजवी शुल्क घेऊ नये – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड; शिक्षकांना सरकारने विषाच्या बाटल्या द्याव्यात-डॉ.कुमार लोंढे

बारावीचा निकाल उद्या या संकेतस्थळ वर उपलब्ध होणार ;वर्षाताई गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .